Pages

SCROLLING TEXT

!! WELCOME !! “ज्ञानज्योत” ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत..!!

सुविचार

प्रेरणादायी सुविचार 

1)                 अंतर्बाह्य प्रांजळपणा हाच प्रीतीचा प्राण होय.
2)                 अंथरूण बघून पाय पसरा.
3)                 अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे.
4)                 अतिथी देवो भव॥
5)                 अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
6)                 अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
7)                 अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
8)                 अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
9)                 अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.
10)            अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप!
11)            अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.
12)            अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
13)            अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.
14)            अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.
15)            आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार?
16)            आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
17)            आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.
18)            आधी विचार करा, मग कृती करा.
19)            आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
20)            आपण एखाद्यास दर्शविण्यासाठी अभ्यास करत असल्यास आपण स्वत: ला फसवित आहात.
21)            आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
22)            आपण काही नवीन करत नसल्यास आपण यश प्राप्त करू शकत नाही.
23)            आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र!
24)            आपण जे पेरतो तेच उगवतं.
25)            आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
26)            आपण हार मानत नाही तोपर्यंत आपला पराभव होणार नाही.
27)            आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.
28)            आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील!
29)            आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
30)            आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
31)            आपल्या पाठीमागे बोलनाऱ्याकडे लक्ष देऊ नका, याचा अर्थ असा आहे की आपण त्यांच्यापेक्षा दोन पाऊल पुढे आहात
32)            आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
33)            आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
34)            आपल्याला पडण्याची भीती असल्यास आपण कधीही उभे राहू शकणार नाही.
35)            आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.
36)            आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात.
37)            आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून, वाचून, बघून समजत नाही.
38)            आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.
39)            आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
40)            आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
41)            आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.
42)            आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
43)            आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.
44)            आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
45)            आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.
46)            आयुष्यात प्रेम कारा; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
47)            आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
48)            आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
49)            आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
50)            आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.
51)            आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.
52)            आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
53)            आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
54)            आव्हाने हीच जीवन रुचीपूर्ण बनवतात. त्यांच्यावर मात करणे म्हणजेच जीवनाला अर्थपूर्ण बनवते.
55)            इतरांप्रमाणेच आपणही अद्वितीय आहात हे नेहमी लक्षात ठेवा.
56)            उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.
57)            उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
58)            उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
59)            उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
60)            उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
61)            उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.
62)            ऎकावे जनाचे करावे मनाचे.
63)            एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
64)            एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.
65)            एकमेका साहय्य करू। अवघे धरू सुपंथ॥
66)            एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
67)            एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
68)            एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
69)            एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
70)            ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.
71)            कठोर परिश्रम केल्याशिवाय टॅलेंट काहीच कामाचे नाही.
72)            कठोर परिश्रमाला पर्याय नाही.
73)            कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.
74)            कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
75)            कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.
76)            कधीकधी डोळे देखील फसवले जातात, म्हणून नेहमी आपले डोळे आणि कान खुले ठेवा.
77)            कधीकधी दुसर्‍या संधी नसतात, वेळ नसते, पुढली वेळ नसते, तेव्हा फक्त आता किंवा कधीच नसते!
78)            कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पहाण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता.
79)            कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात.
80)            कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर!
81)            कविता म्हणजे भावनांचं चित्र!
82)            काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
83)            कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
84)            काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
85)            काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
86)            काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.
87)            कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
88)            कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
89)            कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.
90)            केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
91)            केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
92)            केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
93)            केवळ ज्या व्यक्तीला ध्येय व्यतिरिक्त काही दिसत नाही तोच आपले ध्येय साध्य करू शकतो.
94)            कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
95)            कोणाचा विश्वास कधीही तोडू नका, कारण एकदा तो मोडला की, तो पुन्हा जोडला जाणार नाही.
96)            क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.
97)            क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.
98)            क्रोध माणसाला पशू बनवतो.
99)            खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
100)        खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.
101)        खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
102)        खिडकी म्हणजे आकाश नसतं.
103)        खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
104)        खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.
105)        गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.
106)        गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
107)        गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
108)        गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.
109)        गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
110)        चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
111)        चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
112)        चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.
113)        चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.
114)        चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.
115)        चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.
116)        चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस!
117)        चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
118)        चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
119)        छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
120)        जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
121)        जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
122)        जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
123)        जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
124)        जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.
125)        जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे.
126)        जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.
127)        जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
128)        जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.
129)        जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
130)        जर तुम्हाला सर्वोत्कृष्ट व्हायचं असेल तर तुम्हाला अशी कामे करावी लागतील जी इतर लोक करायला तयार नाहीत.
131)        जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल ज्याने तुमचे आयुष्य बदलले असेल तर तुम्ही आरशात पाहा…!
132)        जर तुम्ही  वेळेसोबत जात नाही आहात तर आपण लोखंडासारखे गंजताल.
133)        जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या सवयी आपला वेळ बदलतात.
134)        जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.
135)        जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
136)        जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.
137)        जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
138)        जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
139)        जीवनात चांगल्या मानसांना शोधू नका, स्वत: चांगले व्हा म्हणजे कोणीतरी तुम्हाला शोधत येईल.
140)        जीवनात तेच व्यक्ती अपयशी होतात जे विचार खूप करतात पण कृती करत नाही.
141)        जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण करू शकत नाही असे लोक म्हणतात ते कार्य करणे होय.
142)        जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.
143)        जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
144)        जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम!
145)        जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
146)        जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
147)        जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.
148)        जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.
149)        जे नंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक !
150)        जे स्वतःसाठी जगतात ते मरतात, जे समाजासाठी मरतात ते जिवंत राहतात.
151)        जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही.
152)        जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.
153)        जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
154)        जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो.
155)        जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
156)        जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !
157)        जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु जो स्वतःच्या मनातुन हार मानतो तो माणूस कधीही जिंकू शकत नाही !!
158)        जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !
159)        ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
160)        ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
161)        ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.
162)        ज्या व्यक्तीने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही.
163)        ज्यांच्याकडून आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात!
164)        ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.
165)        ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव!
166)        ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.
167)        ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
168)        झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
169)        टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.
170)        टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
171)        तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
172)        तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.
173)        तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.
174)        तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
175)        तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.
176)        तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
177)        तुमचे विजय तुमच्या डोक्यावर जाऊ देऊ नका किंवा तुमच्या अपयशा तुमच्या मनात येऊ नयेत.
178)        तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना .
179)        तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
180)        तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच !
181)        तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.
182)        तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
183)        तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
184)        तुम्ही जसे विचार करता तशीच कृती करत असतात
185)        तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.
186)        तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
187)        तुम्ही पाण्यात पडून बुडत नाही; तुम्ही तिथे राहून बुडतात.
188)        तुलना करावी पण अवहेलना करू नये.
189)        तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !
190)        त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.
191)        त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !
192)        दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
193)        दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.
194)        दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.
195)        दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.
196)        दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.
197)        दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.
198)        दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
199)        दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.
200)        दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.
201)        दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
202)        देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !
203)        दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
204)        न मागता देतो तोच खरा दानी.
205)        नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
206)        निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
207)        नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य आपल्याला दररोज एक नवीन संधी देते.
208)        नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.
209)        नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
210)        नैतिक पाया ढासळला की धार्मीकता संपलीच म्हणून समजा.
211)        परमेश्वर ख्रऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.
212)        परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
213)        परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.
214)        परीक्षा जे पात्र आहे त्यांच्यासाठी आहे.
215)        परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी!
216)        पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.
217)        पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.
218)        पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत.
219)        पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
220)        पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते; त्या सुखाचे नाव उत्साह !
221)        पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.
222)        पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.
223)        पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
224)        प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
225)        प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.
226)        प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
227)        प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
228)        प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.
229)        प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
230)        प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.
231)        प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
232)        प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
233)        प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
234)        प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
235)        फळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
236)        बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
237)        बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?
238)        बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.
239)        बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.
240)        बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
241)        बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
242)        बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
243)        भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.
244)        भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
245)        भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.
246)        भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.
247)        भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
248)        भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.
249)        भूतकळा पसून शिका, वर्तमानासाठी जगा, उद्याची आशा ठेवा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला प्रश्न करणे थांबु नका.
250)        मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
251)        मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
252)        मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.
253)        मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.
254)        मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.
255)        मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.
256)        मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
257)        मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.
258)        मरावे परी कीर्तीरूपे उरावे.
259)        माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी.
260)        माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.
261)        माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.
262)        माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
263)        मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
264)        मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
265)        मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
266)        मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
267)        मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
268)        मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
269)        मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.
270)        यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.
271)        यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
272)        यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
273)        यश साजरा करणे चांगले आहे, परंतु आपल्या अपयशापासून शिकणे महत्वाचे आहे.
274)        यश हे दिवस आणि दिवस वारंवार वारंवार पुनरावृत्ती होणार्‍या अनेक लहान प्रयत्नांची बेरीज आहे.
275)        यशाचा कोणताही मंत्र नाही, तो फक्त परिश्रम करण्याचा परिणाम आहे.
276)        यशाचा रस्ता प्रामाणिकपणाच्या मार्गावरुन जातो.
277)        या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
278)        रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !
279)        रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.
280)        राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.
281)        लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
282)        लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
283)        लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
284)        लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.
285)        वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
286)        वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
287)        वात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
288)        वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!!
289)        विचार करण्यात आपला वेळ वाया घालवू नका, आत्ता आपले काम सुरू करा.
290)        विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
291)        विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
292)        विद्या विनयेन शोभते ॥
293)        वेळ खूप वेगाने जात आहे, जे करायचे ते आता पूर्ण करावे लागेल.
294)        वेळ राजाला रंक बनवू शकतो, तर रंकला राजा बनवू शकतो.
295)        वेळेचा अपव्यय तुम्हाला विनाशाकडे नेतो.
296)        वैभव त्यागात असते, संचयात नाही.
297)        व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.
298)        व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
299)        शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
300)        शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
301)        शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.
302)        शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥
303)        शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
304)        शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
305)        शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो.
306)        शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.
307)        शिक्षक केवळ यशाचा मार्ग दर्शवू शकतो, परंतु आपल्याला त्या मार्गाचा अवलंब करावा लागेल.
308)        शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.
309)        शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.
310)        शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे
311)        शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे.
312)        श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
313)        श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
314)        संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
315)        संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.
316)        संघर्ष हे जीवनाचे आणखी एक नाव आहे.
317)        संभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.
318)        संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
319)        संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
320)        सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
321)        सत्याने मिळतं तेच टिकतं.
322)        सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
323)        सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.
324)        सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.
325)        समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी
326)        समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
327)        समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही
328)        सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
329)        सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.
330)        सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.
331)        सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
332)        सुरुशब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
333)        सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
334)        सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
335)        स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
336)        स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
337)        स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.
338)        स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
339)        स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.
340)        स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.
341)        स्वधर्माविषयी प्रेम, परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म.
342)        स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
343)        स्वप्ने ते नसतात  जे झोपेत पडतात , स्वप्ने अशी असतात जे आपल्याला झोपू  देत नाहीत.
344)        स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात
345)        स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.
346)        स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.
347)        स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.
348)        स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
349)        हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
350)        हसा, खेळा पण शिस्त पाळा.
351)        हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.
352)        हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची!
353)        हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!
354)        ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र.
355)        ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.















No comments:

Post a Comment

इयत्ता ५ वी ते १० वी सर्व विषयांचा अभ्यास

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu